नशीब…, नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते…! शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा दसरा मेळावा 2025 : उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

नशीब…, नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते…!

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा दसरा मेळावा 2025 : उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाषण करत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला. इंडिया टुडेने नुकत्याच जाहीर केलेल्या “मोस्ट पॉप्युलर सीएम अॅक्रॉस इंडिया” या सर्वेक्षणाचा दाखला देत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर टीकेची झोड उठवली.

“आपल्या वेळेला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पहिल्या पाचात यायचा. ते माझं कर्तृत्व नव्हतं, ते जनतेचं सहाय्य होतं. महाराष्ट्राच्या जनतेचं कौतुक होतं. पण आजच्या सर्व्हेमध्ये आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दहाव्या क्रमांकावर आहेत. नशीब 10 आले, नाहीतर फडणवीस म्हणून 20वे आले असते,” अशी जोरदार टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

ठाकरेंनी यावेळी सर्वेक्षणातील निकाल वाचून दाखवत, “पहिल्या क्रमांकावर योगी आदित्यनाथ, दुसऱ्या क्रमांकावर ममता बॅनर्जी, तिसऱ्यावर चंद्राबाबू नायडू, चौथ्या स्थानी नीतीशकुमार, पाचव्या स्थानी स्टॅलिन, त्यानंतर पिनरई विजयन, रेवंता रेड्डी, मोहन यादव, हेमंत्ता बिस्वसरमा आणि दहाव्या स्थानावर देवेंद्र फडणवीस,” अशी यादी मांडली.

याचबरोबर राज्यातील कारभारावर हल्लाबोल करताना उद्धव ठाकरे म्हणाले,

  • “संपूर्ण बजबजपुरी करून ठेवली आहे. काय केलंत आजपर्यंत?”

  • “अधिकाऱ्यांवर धाड टाकली जाते, अधिकारी रंगेहात पकडले जातात. पण मंत्री मात्र खोलीत बिनधास्त बॅगा उघड्या टाकून बसतात. त्यांना हात लावण्याची हिम्मत सरकारमध्ये नाही.”

  • “आईच्या नावाने, पत्नीच्या नावाने डान्सबार काढले जात आहेत, दारूचे परवाने दिले जात आहेत. पुरावे सादर केले तरी फडणवीस मंत्र्यांना समज देऊन सोडतात.”

उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल ऐकताना मैदानात उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून वातावरण दणाणून सोडलं.

  • Pankaj Helode

    पंकज हेलोडे हे 'स्वराष्ट्र माझा' न्यूज चॅनलचे संस्थापक, संपादक आणि संचालक आहेत. पत्रकारितेच्या माध्यमातून 'सामान्य माणसाचा बुलंद आवाज' बनण्याच्या ध्येयाने त्यांनी या चॅनलची स्थापना केली. महाराष्ट्रातील तळागाळातील लोकांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या समस्या आणि सामाजिक विषयांना निर्भीडपणे मांडणारे पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली 'स्वराष्ट्र माझा' ने अल्पावधीतच एक विश्वासार्ह आणि लोकप्रिय डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म म्हणून नाव कमावले आहे. सत्यनिष्ठ आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कार्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे.

    Related Posts

    बाळासाहेबांच्या आठवणीत राज ठाकरे भावुक,सद्यस्थितीवर हल्लाबोल

    मुंबई: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती. या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत बाळासाहेबांना भावनिक…

    Continue reading
    मुंबई आम्ही अजूनही रोखू शकतो; संजय राऊतांचा भाजपला इशारा

    मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि सत्ताधारी शिंदे गटावर कडाडून टीका केली आहे. “आम्ही आजही…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *