संजय राऊतांचा रामदास कदमांवर घणाघात: “बाळासाहेबांच्या मृत्यूची विटंबना करणाऱ्यांना जबर किंमत मोजावी लागेल”

मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यावर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली आहे. रामदास कदम यांनी ठाकरे कुटुंबासोबत कृतज्ञ राहायला पाहिजे होते, मात्र ते आता गरळ ओकत आहेत, असे राऊत म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर काही लोक त्यांची विटंबना करत असून, याची जबर किंमत त्यांना मोजावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

संजय राऊत म्हणाले की, “ज्या माणसाला (रामदास कदम) पक्षाने १२ वर्षे विधान परिषदेवर पाठवले, विरोधी पक्षनेतेपद आणि मंत्रिपद दिले, त्यांनी अशी विधाने करताना लाज बाळगली पाहिजे. विशेषतः उद्धव ठाकरे यांनी त्यांना भरपूर संधी दिली.”

बाळासाहेब ठाकरे यांच्या शेवटच्या दिवसांची आठवण करून देत राऊत म्हणाले, “जेव्हा बाळासाहेबांची प्रकृती चिंताजनक होती, तेव्हा मी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्यासोबत होतो. आम्ही काही मोजकेच लोक तिथे होतो. रामदास कदम तेव्हा कुठे होते?”

राऊत यांनी पुढे म्हटले की, “उद्धव ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूची आणि त्यांच्या मृतदेहाची विटंबना करण्यापर्यंत या लोकांची मजल गेली आहे. केवळ टाळ्या मिळवण्यासाठी अशी विधाने केली जात आहेत, पण महाराष्ट्र त्यांच्यावर थुंकत आहे.”

या सर्व आरोपांवर अधिक माहिती देण्यासाठी आज दुपारी १२ वाजता अनिल परब यांची पत्रकार परिषद होणार असल्याचेही राऊत यांनी सांगितले. “पद आणि पैशासाठी एखादी व्यक्ती किती खालच्या पातळीवर जाऊ शकते, हे रामदास कदम यांनी दाखवून दिले आहे,” असे ते म्हणाले.

एकनाथ शिंदे आणि इतर पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांवर टीका करताना राऊत म्हणाले, “जे लोक भाजपच्या चरणी विलीन झाले आहेत आणि अमित शहांच्या ‘जोड्यांची’ शस्त्र म्हणून पूजा करत आहेत, ते कधीही बाळासाहेब ठाकरे यांना दैवत मानू शकत नाहीत.” “आम्ही अजून जिवंत आहोत आणि पुढे काय करायचे ते आम्ही पाहू,” असा इशाराही त्यांनी दिला.

Pankaj Helode

पंकज हेलोडे हे 'स्वराष्ट्र माझा' न्यूज चॅनलचे संस्थापक, संपादक आणि संचालक आहेत. पत्रकारितेच्या माध्यमातून 'सामान्य माणसाचा बुलंद आवाज' बनण्याच्या ध्येयाने त्यांनी या चॅनलची स्थापना केली. महाराष्ट्रातील तळागाळातील लोकांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या समस्या आणि सामाजिक विषयांना निर्भीडपणे मांडणारे पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली 'स्वराष्ट्र माझा' ने अल्पावधीतच एक विश्वासार्ह आणि लोकप्रिय डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म म्हणून नाव कमावले आहे. सत्यनिष्ठ आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कार्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे.

Related Posts

बाळासाहेबांच्या आठवणीत राज ठाकरे भावुक,सद्यस्थितीवर हल्लाबोल

मुंबई: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती. या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत बाळासाहेबांना भावनिक…

Continue reading
मुंबई आम्ही अजूनही रोखू शकतो; संजय राऊतांचा भाजपला इशारा

मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि सत्ताधारी शिंदे गटावर कडाडून टीका केली आहे. “आम्ही आजही…

Continue reading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *