भाजयुमोच्या कार्यकर्त्यांकडून कार्यालयाची तोडफोड झाल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, विजय वडेट्टीवार म्हणाले…

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. या घटनाक्रमाला प्रत्युत्तर म्हणून भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेस मुख्यालयावर हल्ला केला. कार्यालयातील खुर्च्या तोडण्यात आल्या, शाहीफेक आणि दगडफेक करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, “हे भाजपचे कार्यकर्ते नसून पोसलेले गुंड आहेत. आम्हीही आंदोलने केलीत, पण हिंसेचा मार्ग कधीही स्वीकारला नाही. काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला करून खुर्च्या फोडल्या जात असतील आणि जीव घेण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर हे गंभीर आहे.”

दलितांवर अन्याय, कार्यकर्त्यांची हिंमत वाढल्याचा आरोप

वडेट्टीवार पुढे म्हणाले, “राज्यात कायदा-सुव्यवस्था पूर्णतः बिघडली आहे. परभणीत दलित बांधवांवर अन्याय झाला. सरपंच संतोष देशमुख यांचा बळी गेला. सत्ता आल्यापासून भाजपच्या कार्यकर्त्यांची हिंमत वाढली आहे, विरोधकांच्या कार्यालयांवर हल्ले होत आहेत.”


भाजयुमोच्या आंदोलनावर टीका

वडेट्टीवार यांनी भाजयुमोच्या कृतीवर टीका करत सांगितले, “ते बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन आले. आम्हाला वाटलं, ते आमच्यासोबत आहेत, पण प्रतिमा बाजूला ठेवून त्यांनी कार्यालयावर हल्ला केला. हे गुंडगिरीचं लक्षण आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन करणं महत्त्वाचं आहे, हिंसा नव्हे.”

अमित शाहांवर आरोप

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याबद्दल अमित शाह यांच्यावर निशाणा साधताना वडेट्टीवार म्हणाले, “संविधानामुळेच देशातील प्रत्येकाला अधिकार मिळाले आहेत. बाबासाहेबांचा अपमान कोणीही सहन करणार नाही. आंदोलन हे लोकशाही मार्गानेच व्हावं.”

पोलीस यंत्रणेवरही सवाल

“कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली परभणीत माणसांचे जीव घेतले जात आहेत. पोलिसांच्या सूचनांवर कोणाचा प्रभाव आहे? पोलिसांवर काय कारवाई केली जाणार?” असे सवालही वडेट्टीवारांनी उपस्थित केले.

काँग्रेसने या प्रकरणावर कठोर भूमिका घेत, पुढील आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

  • Related Posts

    पार्थ पवार जमीन घोटाळा: मुंढवा प्रकरण रद्द; बोपोडीत नवा गुन्हा

    उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा; मुंढवा जमीन व्यवहार रद्द मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया एंटरप्रायजेस’ कंपनीशी संबंधित पुण्यातील मुंढवा येथील वादग्रस्त जमीन खरेदी व्यवहार अखेर…

    Continue reading
    “धन्या, तू पक्का अडकला”; जरांगेंनी मुंडेंची ऑडिओ क्लिप ऐकवली!

    बीड: मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करत एक ऑडिओ क्लिप पत्रकार परिषदेत  ऐकवली आहे. मुंडेंनी आपल्या हत्येचा कट रचल्याचा आणि त्यासाठी…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *