माझे संपूर्ण जीवन भाजपासाठी समर्पित केले, पण मला खासदारकी दिली नाही… आता आमदारकीही नाही! – माजी खासदार गोपाळ शेट्टी अपक्ष लढणार

माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी भाजपवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शेट्टी म्हणाले की, बोरिवली हा काही धर्मशाळा नाही. भारतीय संविधानात एक नगरसेवक, एक विधानसभा आणि एक लोकसभा मतदारसंघ असतो. परंतु भाजप वारंवार बाहेरच्या उमेदवारांना बोरिवलीत आणते, आणि यामुळे स्थानिक जनतेच्या भावनांवर अन्याय होत आहे.

शेट्टींनी आपल्या भाषणात सांगितले की, “भाजपाने आधी विनोद तावडे, नंतर सुनील राणे आणि पीयूष गोयल यांना इथे आणले. तरीही मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलो. परंतु आता पुन्हा एकदा बाहेरच्या उमेदवाराला आणून माझा अपमान केला आहे. बोरिवलीच्या जनतेने मला दीर्घकाळ साथ दिली आहे, आणि आता लोकांची भावना मला जाणवत आहे की, जर मी आता लढलो नाही, तर येत्या ५० वर्षांत इथे कुणीही स्थानिक उमेदवार उभा राहणार नाही.”

 

गोपाळ शेट्टींनी पुढे स्पष्ट केले की, “मी माझे संपूर्ण जीवन भाजपासाठी दिले, पण आता मला ना खासदारकी मिळाली, ना आमदारकी. त्यामुळे जनतेच्या भावनेचा आदर ठेवून, मी आता अपक्ष उमेदवार म्हणून बोरिवलीतून निवडणूक लढणार आहे.”

 

गोपाळ शेट्टींच्या या घोषणेने बोरिवलीत राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, भाजपासाठी हे मोठे आव्हान ठरणार आहे.

  • Related Posts

    फरहान आझमी यांची काँग्रेसच्या शिस्तभंग समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

    नवी दिल्ली – ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने महत्त्वाचा निर्णय घेत डिसिप्लिनरी ऍक्शन कमिटीच्या (शिस्तभंग समिती) अध्यक्षपदी फरहान आझमी यांची नियुक्ती जाहीर केली आहे. पक्ष संघटनेत शिस्त व नियोजनबद्धता राखण्यासाठी ही…

    पुण्यात उद्धव सेनेला मोठा धक्का: पाच माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

    पुणे – आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. पुण्यातील उद्धव सेनेचे पाच माजी नगरसेवक आज भाजपमध्ये दाखल झाले. मुंबईत आयोजित कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *