महाराष्ट्र – झारखंड निवडणुकीची घोषणा आज; दुपारी 3.30 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

नवी दिल्ली: निवडणूक आयोग (EC) आज दुपारी 3.30 वाजता महत्वपूर्ण पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेच्या आगामी निवडणुकीची अधिकृत घोषणा करणार आहे. महाराष्ट्रात एका टप्प्यात, तर झारखंडमध्ये 5 टप्प्यात मतदान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाराष्ट्रात सध्या शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत असून, ही निवडणूक त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा कार्यकाळ लवकरच संपत असून, तिथे निवडणुकीला मोठी राजकीय रणधुमाळी होण्याची चिन्हे आहेत.

मतदानाच्या तारखा, उमेदवारांच्या यादीसाठी अर्जाची शेवटची तारीख, आणि निकाल जाहीर होण्याच्या तारखा याबाबत अधिकृत माहिती आजच्या पत्रकार परिषदेत समोर येईल. याबाबतच्या अधिकृत घोषणेची सर्वांनाच उत्सुकता आहे.

निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर सर्वच प्रमुख राजकीय पक्ष आपले धोरण ठरवतील आणि प्रचाराच्या रणधुमाळीला जोरदार सुरुवात होईल.

  • Related Posts

    फरहान आझमी यांची काँग्रेसच्या शिस्तभंग समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

    नवी दिल्ली – ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने महत्त्वाचा निर्णय घेत डिसिप्लिनरी ऍक्शन कमिटीच्या (शिस्तभंग समिती) अध्यक्षपदी फरहान आझमी यांची नियुक्ती जाहीर केली आहे. पक्ष संघटनेत शिस्त व नियोजनबद्धता राखण्यासाठी ही…

    महाराष्ट्र नवीन गुन्हेगारी कायद्यांच्या अंमलबजावणीस सज्ज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    नवी दिल्ली, दि. 14: नवीन गुन्हेगारी कायद्यांमुळे गुन्हे तपास, न्यायदान आणि फॉरेंसिक प्रक्रिया अधिक आधुनिक व प्रभावी होणार असून पोलिस दल, न्यायालयीन प्रक्रिया आणि फॉरेंसिक यंत्रणा अधिक सक्षम व सज्ज…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *